दिव्य मराठी विरुद्ध दाखल गुन्हा परत घेण्यात यावा महाराष्ट्र उर्दू पत्रकार संघाची मागणी।
दिव्य मराठी विरुद्ध दाखल गुन्हा परत घेण्यात यावा महाराष्ट्र उर्दू पत्रकार संघाची मागणी
औरंगाबाद-औरंगाबादेत दिव्य मराठी टीमवर गुन्हा दाखल झाला . कोरोनाच्या निराकारणात प्रशासन कमी पडतय त्या बद्दल प्रश्न विचारणाऱ्या प्रसार माध्यमांवर दबाव आणण्याचा प्रयत्न सुरू आहे . पत्रकार आणि पत्रकारिता करणारी प्रसार माध्यमे खरी वस्तुस्थिती समाजासमोर आणण्यासाठी स्पष्टपणे आपली मतं प्रसार माध्यमातून मांडत असतात . प्रशासन आणि इन्वेस्टिगेशन संस्था तपास करण्यासाठी सुसज्ज असतात आणि त्यांना पत्रकारितेची मदत हवी असते.परंतु पत्रकारितेचा आवाज दाबविणे हा अन्याय आहे . तरी या प्रेसनोट द्वारे महाराष्ट्र उर्दू पत्रकार संघाची अशी मागणी आहे की दिव्य मराठी विरुद्ध दाखल झालेली गुन्हे परत घेण्यात यावी . सदर बाबतीत महाराष्ट्र उर्दू पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष जमील अहेमद शेख उपाध्यक्ष सय्यद फारूक अहेमद सचिव अब्दुल्ला रजा व उपसचिव अब्दुल वहाब यांच्या ऑनलाईन झालेल्या मीटिंग मध्ये निवेदन देण्याचा निर्णय घेण्यात आला व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तसेच औरंगाबाद जिल्हाधिकारी यांना ई मेलद्वारे निवेदन सादर करण्यात आले.